‘चिटणीस बखर’ ही मल्हार रामराव चिटणीस यांनी 1810 ते 1811 या कालावधीत लिहिली. ती सातारचे शाहू (दुसरे) यांच्या आदेशाने लिहिली गेली. मल्हार रामराव चिटणीस हे शिवाजी महाराजांचे मुख्य कारकून बालाजी आवजी यांचे सातवे वंशज होते. ‘चिटणीस बखर’ ही शिवाजी महाराजांचे मराठी गद्य चरित्र असून, त्यांच्या जीवन व कारकिर्दीचे सविस्तर वर्णन करणाऱ्या महत्त्वाच्या बखरींपैकी एक आहे.
This Question is Also Available in:
English